Posts

Showing posts from September, 2019

पावती मिळाली

कोऱ्या कागदावर त्याने उमटविला एक कधीही न पुसता येणारा ठसा आणि चार अक्षरे सहीची ...ही घे पावती नि:शब्दपणे मी तो कागद उचलला ती पावती होती? की संपलेल्या नात्याची निशाणी ! आजपर्यंत केलेल्या प्रेमाची,वाहिलेल्या वेदनांची झालर होती त्या सुरकुतलेल्या कागदाला, कागद? कोरड्या मनाने खरडलेल्या सहीच्या आजूबाजूला नव्हती कसलीच निशाणी आपल्या नात्याची.... व्यावहारिक जगात एखादी गोष्ट अथवा व्यवहार पूर्ण झाल्यावर आपल्याला पावती मिळते.अनेकदा पावती मिळत नसेल तर आपण ती आवर्जून मागून घेतो. खरेतर पावती कशाकशाची मिळू शकते ? तर कशाचीही ...अगदी सहा रुपयाचा चहा तुम्ही प्यायलात तरी तुम्ही पावती मागू शकता. बागेत आपण जातो तर तिथे प्रवेशाला दोन रुपये असतात. आपण दोन रुपये देतो आणि ती बारकीशी पावती खिशात किंवा पर्समध्ये टाकतो. काहीजण हातातच ती खेळवत राहतात आणि बागेतून बाहेर पडताना तिथेच फाडून फेकून देतात. वास्तविक पाहता आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत पावतीला अगदी अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि असायलाच हवे कारण त्यातून व्यवहार पारदर्शी होतो.फसवणूक टाळता येते.पावती हरवली तर मात्र यातील काहीच होऊ शकत नाही.पण...

नव्या रस्त्याच्या शोधात

मी रेखीन माझीच वाट, चालणार नाही मळलेल्या वाटांवरून त्याच त्याच कधी विस्कटलेल्या ,पुसट झालेल्या, काही खाच खळग्यानी भरलेल्या,तर काही अगदीच सपाट .... नको तेवढ्या गुळगुळीत... माझी वाट असेल वेगळी, जी जाईल दूर क्षितिजापार शोधेल नवी स्वप्ने आणि उठवेल स्वत:चा ठसा त्यांच्यासाठी , ज्यांना वेड आहे साहसाचे, जे भीत नाहीत जगण्याच्या आव्हानांना सामोरे जातात ठामपणे टीकांना आणि शंकांना कारण त्यांना माहित असते..भेटेल त्यानाही कधीतरी माझ्यासारखा सहप्रवासी नवीन वाटा रेखणारा             माणसाचे जीवन म्हणजेच एक शोधयात्रा! मानवी संस्कृतीचा विकास झाला तो या शोधयात्रेतून! नवीन आवाहनांना आणि आव्हानानाही सामोरे जाताना अनेकांनी मळलेली पायवाट सोडून दिली आणि अनेक भटक्यांनी शोधला स्वत:चा रस्ता. नाविन्याची ओढ,जगाच्या आणि स्वत:च्याही अस्तित्वाबद्दल असलेले कुतूहल, या अनंत अपार विश्वातील माणसाचे असलेले नगण्य स्थान जे माणला जाणवत होते पण कदाचित मानवत नव्हते. यातून त्याने आपल्या परीने मार्ग काढला आणि संपूर्ण शक्तीनिशी तो उभा राहत गेला. कवी,...